एका शेतकऱ्याच्या मुलाने यशस्वी आय टी कंपनी स्थापन केली

तो गरीबीशी लढला आणि मात केली. मल्याळी असल्याने आपल्या मल्लु उच्चारण आणि खाण्याच्या सवयींमुळे त्याला खूप चिडवले गेले. त्याला वर्णद्वेषाचा त्रास झाला. आपल्या कुटुंबासाठी फुटबॉल वरच्या प्रेमयाचा त्याला त्याग करावा लागला.

आज, केरळच्या लहान खेड्यातून आलेल्या या वरुण चंद्रनने एक यशस्वी आयटी कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीचे तो सीईओ आहे आणि एक लक्षाधीश आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या लहान गावात त्याचा जन्म झाला, तिथे त्याने आपल्या कंपनीची एक शाखापण उघडली आहे.

वरुण यांचा जन्म केरळमध्ये कोलाममजवळ पादम नावाच्या छोटया गावात झाला. तिथे ८०० कुटुंबे जवळपासच्या जंगलामध्ये काम करणारे गरीब भूमिहीन कामगार होते. गावात वीज नसल्याने केरोसीनच्या दिवाच्या प्रकाशाखाली अभ्यास करावा लागत असे. त्याची आई आपल्या घराबाहेर किराणा दुकानात चालवत असे. ती एक जिद्दी महत्त्वाकांक्षी महिला होती, जिने मुलांनी शेजारच्या मोठया गावात इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घ्यावे असा आग्रह धरला.

त्यांचे किराणा दुकान चांगले चालत नसे आणि आर्थिक परिस्थिती बिकट होती. कर्जबाजारीपणामुळे त्यांच्या घरामधल्या सर्व वस्तू गमवाव्या लागल्या होत्या आणि फरशीवर झोपण्याची वेळही आली होती. शाळेची फी फक्त २५ रुपये इतकी होती पण त्याचे आईबाबा सहा/सात महिने शुल्क भरू शकले नाहीत म्हणून त्याला अनेकदा वर्गाबाहेर फेकण्यात येण्यासारख्या अपमानास्पद अनुभवातून जावे लागले होते. नंतर त्यांना एका बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आले आणि वरुण यांच्या जीवनात बदल झाला.

Source: Rediff.com

Leave a Comment